महाराष्ट्र

पांडुरंग कारखान्याला देश पातळीवरील नवी दिल्ली येथील संस्थेचा पुरस्कार जाहीर

गळीत हंगाम 2023-24 मध्ये कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार जाहीर

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि.नवी दिल्ली यांचा गळीत हंगाम 2023-24 मध्ये कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार मिळाला असून, त्याचे वितरण नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब यांनी दिली असून यावेळी व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक साहेब यांनी माहिती दिली की, कारखान्याच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कारखान्याच्या कामामधील तत्परतेमुळेच गळीत हंगाम 2023-24 मध्ये नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांचा तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार मिळाला असून पुरस्कार मिळविण्याची मालिका अखंडित सुरु ठेवली आहे. 

यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्याचे चेअरमन मा.आ. श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालक व अधिकारी यांच्या सहकार्याने कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांचा तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारासह आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील 11 पुरस्कार व राज्य पातळीवर 55 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.  कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 हा कारखान्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या हंगामात कारखान्याने नव्याने ज्यूस टू इथेनॉल प्रकल्प सुरू केला असुन, कारखान्याचे आधुनिकीकरण करून कारखाना सुमारे 8500 प्रतिदिन गाळपक्षमतेने चालवण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस होता. परंतु ज्युस ते  इथेनॉलवर केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे बंदी आल्याने कारखान्याचा आसवनी प्रकल्प बंद ठेवावा लागला. तरीदेखील कारखान्याने गाळपक्षमतेमध्ये नवीन उच्चांक तयार करून जास्तीत-जास्त गाळप केले. या हंगामात कारखान्याने 10.71 लाख मे. टन ऊस गाळप करून 11.53 लाख क्विं. साखर उत्पादित केली. या हंगामात कारखान्याने 11.15 टक्के इतका साखर उतारा मिळविला असून हा उतारा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून कारखान्याने या हंगामात अखेरपर्यंत उसाचे गाळप करून कमीत कमी लॉसेस ठेवून विनाखंड गाळप केले. नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि.नवी दिल्ली यांनी कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ, साखर उताऱ्यात वाढ, कमीत कमी लॉसेस, स्टीमचा कमीत कमी वापर, जास्तीत जास्त वीज एक्स्पोर्ट, कारखाना बंदचे प्रमाण खूपच कमी इत्यादी मध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे कारखान्यास देशपातळीवरील तांत्रीक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. देशपातळीवर पुरस्कार मिळालेबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक साहेब व व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे यांनी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी वर्गाचे आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. 

यावेळी कारखान्याचे संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.उमेशराव परिचारक, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासाहेब यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हनुमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री.सिताराम शिंदे, श्री.दिलीप गुरव, श्री.सिताराम  शिंदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील, श्री.दाजी भुसनर आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!