महाराष्ट्र

महाळुंग मध्ये युवकाची निर्घृण हत्या | मशानभूमीत झाला खून

रात्री कार्यक्रमामधून हालगी वाजून शिवाजी घरी आला होता 

महाळुंग तालुका माळशिरस येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण वय २२ वर्ष,  या युवकाची महाळुंग मधील मशानभूमी मध्ये निर्घृण हत्या झाल्याची घटना रात्री घडली आहे.  सकाळी अकलूज पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅब साठी नमुने देखील घेतले आहेत,  श्वान पथकाला देखील बोलवण्यात आले आहे,  घटनास्थळी दुचाकी गाडी, मोबाईल, दोन  धारदार लोखंडी तीक्ष्ण हत्यारे, दिसून येत आहेत.  शव विच्छेदनासाठी मृतदेह  अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

पंढरपूरचे डीवायएसपी अर्जुन भोसले, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पीएसआय साळुंखे, पीएसआय महाडिक मॅडम, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉ. संजय चंदनशिवे, किशोर गायकवाड, यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवून, पंचनामा केला आहे,  डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढील तपासासाठी पोलिसांना मार्गदर्शक सूचना देऊन, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथके पाठवली आहेत. 

महाळुंग  गावातीलच काही संशयतांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मृत युवक शिवाजी चव्हाण हा अकलूज येथील साखर कारखान्यांमध्ये काम करत होता.  तसेच तो हालगी वाजवण्याचे देखील काम करत होता. रात्री कार्यक्रमामधून हलगी वाजून शिवाजी घरी आला होता. त्यानंतर मशानभूमी मध्ये ही घटना घडली आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी,  लहान मुलगी  असा परिवार आहे. 

घटनेची माहिती मिळताच गावातील व परिसरातील अनेक लोकांनी मशानभूमीकडे मोठी गर्दी केली होती.  अकलूज पोलीस स्टेशनने महाळुंग गावामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!