पांडुरंग कारखान्याचे झाले मोळी पूजन, गळीत हंगामाचा झाला शुभारंभ
साडे आठ हजार ते नऊ हजार मे.टनाने गाळप करण्याचे उद्दिष्ट

श्रीपूर ता. माळशिरस कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामाच्या शुभारंभ सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गव्हाणी मध्ये मोळी टाकून करण्यात आला करण्यात आला.
यावेळी युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक व पांडुरंगचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सालविठठ्ल यांचे हस्ते गव्हाणीचे पुजन करण्यात आले . सर्व प्रमुख पाहुण्यांचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी स्वागत केले .
यावेळी कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी साखर कारखान्याच्या साखरेची एम एस पी कित्येक वर्षापासून ३१०० रुपये प्रति क्विंटल इतकीच आहे. ही वाढवणे अत्यंत आवश्यक असून ३७०० प्रति क्विंटल इतकी एम एस पी होणे गरजेचे आहे. तरच कारखान्याचे आर्थिक गणित बसून जास्तीत जास्त ऊस दर शेतकऱ्यांना देणे सोयीचे होणार आहे. चेअरमन प्रशांत परिचारक यांनी गतवर्षीच्या ऊसाला सर्वाधिक २७५१ रु . दर दिला हा एफ.आर पी . पेक्षा जास्त असून यावर्षी कारखान्याने मिल, बॉयलर विभागाची कार्यक्षमता वाढवल्याने यंदा साडे आठ हजार ते नऊ हजार मे.टनाने गाळप करण्यात येणार असून उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप केले जाणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी चेअरमन प्रशांतराव परिचारक, युटोपिअन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, पांडुरंगचे उपाध्यक्ष कैलास खुळे, जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलिपराव चव्हाण , वसंतनाना देशमुख, दाजी पाटील, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भगवान चौगुले, लक्षण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरु वाघमारे, गंगाराम विभूते, हणमंत कदम, दिलिप गुरव, सुदाम मोरे, किसन सरवदे, विजय जाधव, शामराव साळुंखे, कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मान्यवर उपस्थित होते .