महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषद निवडणूक : पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांची माघारी

उमेदवारी माघारी प्रक्रियेला सुरुवात; अकलूज मध्ये तीन उमेदवारांनी घेतले फॉर्म माघारी

अकलूज नगरपरिषद निवडणूक रंगतदार; प्रक्रियेच्या पहिल्या दिवशीच त्रिकूटाची माघार

अकलूज दि.19 — (संपादक – दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज)

अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी माघारी प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तिघा उमेदवारांनी स्वेच्छेने माघार घेतली असून, यामुळे स्पर्धेत राहिलेल्या उमेदवारांची संख्या ९८ वर आली आहे. काल (दि.१८) झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आजपासून माघारीची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया २१ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

आज अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये प्रभाग क्र. ६ ए मधील अनिता चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट), प्रभाग ६ बी येथील रणजीत भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) तसेच अपक्ष उमेदवार दिपाली करने यांचा समावेश आहे.

या माघारीनंतर संबंधित प्रभागांमध्ये निवडणुकीची गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या दोन उमेदवारांच्या माघारीमुळे पक्षाची रणनीती आणि बहु-कोनी लढतीतील स्थान पुन्हा एकदा तपासावे लागणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.

अजून दोन दिवस माघारी प्रक्रियेचा कालावधी शिल्लक असल्याने आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. २३ नोव्हेंबर रोजी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!