महाराष्ट्र

शिक्षक दिनानिमित्त लवंग येथे कृषिकन्यांकडून शिक्षकांचा सन्मान

स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला

शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देताना कृषिकन्या शिक्षक व इतर मान्यवर.

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई वडील जसे मुलांवर संस्कार करतात, तसे गुरु हे मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतात. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.
यालाच अनुसरून रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या अस्मिता शिंदे, दिशा मगर , कल्याणी मोरे , साक्षी सरगर , संजना पाटील, शुभांगी खोमणे , सुप्रिया भिताडे, उत्कर्षा फुले,वैष्णवी सानप यांच्याकडून लवंग येथे शिक्षकांचा सत्कार‌ करण्यात आला, मा.श्रीमती . स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील (संस्थापक, चेअरमन आनंदी गणेश सेवाभावी संस्था, अकलूज ) मा. सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील (मा. सभापती पंचायत समिती, माळशिरस ) , माजी उपसरपंच मधुकर वाघ, ग्रामविकास अधिकारी मोहन मिटकल, क्लर्क बापू खंडागळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तरी याप्रसंगी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर . जी . नलावडे , कार्यक्रम समन्वयक प्रा . एस . एम एकतपुरे , प्रोग्राम ऑफिसर प्रा . एम . एम . चंदनकर आणि प्रा . एच . व्ही . कल्याणी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!