प्रेयसी, तिचा पती आणि एकजण पोलिसांच्या ताब्यात
प्रेयसीच्या मदतीने पिलीव येथील तरुणाची हत्या ?

प्रेयसीच्या मदतीने पिलीव येथील तरुणाची हत्या ?, प्रेयसी तिच्या पतीसह आणखी एकजण पोलिसांच्या ताब्यात….
प्रेयसी तिच्या पतीसह आणखी एकजण पोलिसांच्या ताब्यात….
माळशिरस/प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द या युवकाचा सोमवारी रात्री अतिशय निर्घुण खून करुन मृतदेह पिलीव – चांदापुरी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत फेकून दिला होता. मयताचे शरीरावर एवढे विचित्र चटके दिले होते, तसेच गुप्तांग कापले होते, तोंडात सुद्धा सळईचे चटके दिले होते. एवढ्या विचित्र पद्धतीने आकाशची हत्या केल्यामुळे खरेतर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तपास करणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते.पण सोमवारी रात्री उशिरा आकाशला आलेल्या फोनमुळे या हत्येला वाचा फुटली.
चांदापुरी येथील एका महिलेचे व आकाशचे गेल्या पाच – सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते.त्याचे येणे-जाणे ,फोनवरुन बोलणे ,सोशल मीडियावरुन बोलणे सुरू होते.यामुळे एवढ्या रात्री आपल्या प्रेयसीचा फोन आला म्हटल्यावर आकाश आपल्या आई व पत्नीला मी दहा मिनिटात परत येतो म्हणून गेला, तो लवकर परत येईना म्हटल्यावर आईने रात्री खूप उशीरा फोन केला. पण तो फोन उचलतच नव्हता.
प्रेयसीच्या मदतीनेच आकाशला त्याठिकाणी बोलावुन नवरा व इतर नातेवाईकाच्या मदतीने अमानुषपणे हत्या करण्यात आली व वनविभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकुन दिला. शेजारीच त्याची मोटारसायकल होती.मंगळवारी सकाळी मेटकरीमळा येथील लोकांनी हा मृत्यदेह पाहुन पोलीस स्टेशनला खबर दिली.तसेच याचवेळी यश चोरमले याने आकाशच्या आईला खबर दिली. यावेळी पोलीसांनी रितसर पंचनामा करुन व माळशिरस येथे शवविच्छेदन करुन रात्री उशीरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पोलीसांनी तपासची सुत्रे अतिशय वेगाने फिरवली. यामध्ये प्रेयसीने केलेल्या फोनवरुन बराच उलगडा झाला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा,प्रेयसी हिला पोलीसांनी ताब्यात घेतले, तर तिचा नवरा फरार होता. मात्र बुधवारी रात्री पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याला ताब्यात घेतले.यामुळे आता या हत्येच्या मागे इतर कोण-कोण सामील आहेत, याचा उलगडा लवकरच होणार आहे. प्रेयसीनेच आपला प्रियकर आकाश याला बोलावुन घेऊन नातेवाईकांच्या मदतीने त्याचा अमानुषपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यामधील प्रेयशीचे लग्न झालेले आहे. तिचा पती परदेशात नोकरीला आहे. तर आकाशचेही लग्न झाले असून त्याला फक्त दोन महिन्याचा मुलगा आहे. चार वर्षापुर्वी आकाशच्या वडीलाचे निधन झाले असून तो शेती तसेच ग्रीलचा व्यवसाय करुन आपली उपजिवीका करीत होता. या घटनेमुळे आकाशची आई अनिता व पत्नी ऐश्वर्या हिने अक्षरशः हंबरडा फोडला असुन हृदय पिटाळून टाकणाऱ्या या हत्येने अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत निश्चित अजून किती आरोपी आहेत? याचा तपास पोलीस कसून करीत असुन यामध्ये बरेच आरोपी असल्याची चर्चा आहे.
सध्या सोशल मीडिया व मोबाईलमुळे खरेतर मित्र, मैत्रीणी असो की समाजात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये महिला असो किंवा पुरुष नक्की दोष कोणाचा? हा आत्मचिंतनाचा विषय आहे. यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत याचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.